वलांडी परिसरात शेतक-यांकडून पेरण्यांना सुरुवात

वलांडी : हसन मोमीन
वलांडी, जून आणि जुलै हे दोन्ही महिने बहुतांश कोरडे गेल्याने चिंतेत असलेल्या वलांडी परिसरातील शेतक-यांना अखेर जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतक-यांनी पुन्हा शेतात धाव घेत पेरणीच्या कामांना वेग दिला असून परिसरात सर्वत्र कृषी कामांसाठी लगबग सुरू झाली आहे.
यावर्षी मान्सूनच्या अनियमिततेमुळे जून व जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक शेतक-यांनी शेती मशागत करून शेते पेरणीसाठी तयार ठेवली होती; मात्र पावसाअभावी पेरणी रखडली होती. काही शेतक-यांनी धाडसाने केलेली पेरणी उगवण न झाल्याने किंवा उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आल्याने चिंता वाढली होती. दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसांत परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.  वलांडी, बोंबळी (बु.), बोंबळी (खु.), टाकळी, कोरेवाडी तसेच कर्नाटक सीमेलगतच्या आळवाई, येलमवाडी आदी गावांतील शेतांमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे  वर्दळ वाढली असून शेतकरी दिवसभर पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे परिसरात प्रामुख्याने सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकांची पेरणी सुरू झाली आहे. शेतक-यांच्या चेह-यावर पुन्हा आशेचे वातावरण निर्माण झाले असले तरी पुढील काही दिवस नियमित आणि समाधानकारक पाऊस होणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या झालेला पाऊस पेरणीसाठी पोषक असला तरी पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी सातत्याने पाऊस होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. जून-जुलै महिन्यातील दीर्घ खंडामुळे हवालदिल झालेल्या शेतक-यांना अखेर निसर्गाने दिलासा दिला असून, आता सर्वांचे लक्ष पुढील पावसाकडे लागले आहे. नियमित पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामास नवसंजीवनी मिळेल आणि शेतक-यांच्या उत्पादनाबाबतच्या अपेक्षा पुन्हा उंचावतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35

Latest news