युवा रुरल असोसिएशनचा ‘बाल विवाहमुक्त भारत’ ला पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने बालविवाह विरोधी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सुद्धा जिल्ह्यात युवा रुरल असोसिएशन च्या सहकार्याने रॅल्या, शपथविधी समारंभ आयोजित करण्याची तयारी केली आहे. याच अनुषंगाने सोनवती येथे आयोजित ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिमेमध्ये गावातील ४०० हून अधिक लोकांनी कॅण्डल मार्च काढून ‘बाल विवाहमुक्त भारत’ विषयी बालविवाह विरुद्ध शपथ घेतली. या वेळी युवा रुरल असोसिएशनकार्यक्रम समन्वयक सद्दाम शेख यांनी उपस्थितांना शपथ दिली.

दरम्यान,केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने बालविवाहाविरोधात रॅलींचे, शपथविधी समारंभांचे आयोजन करत आहे. जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन (जेआरसी) हे देशभरातील ४०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या २५० पेक्षा जास्त बाल संरक्षण एनजीओ भागीदारांचे राष्ट्रीय नेटवर्क आहे आणि युवा रुरल असोसिएशन ही त्यात युतीचा भागीदार आहे.

२७ नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम जाहीर केली होती आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांना बालविवाहविरोधी शपथ दिली असून ही मोहिम २५ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे. बालविवाहाची माहिती देणे सोपे जावे म्हणून एका राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आले.

या देशव्यापी मोहिमेबद्दल आणि त्यामुळे वास्तविक स्वरूपात त्यांचे काम लवकर कसे होईल, याविषयी बोलताना युवा रुरल असोसिएशन चे कार्यक्रम समन्वयक सद्दाम शेख म्हणाले, बालविवाहांबाबत जनजागृती करण्यासाठी, असे कोणतेही विवाह रोखण्यासाठी आम्ही सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रमुख यांच्यासमवेत जिल्ह्या काम करीत आहोत आणि त्यासोबतच सरकारच्या या मोहिमेमुळे या लढ्याला नवी ऊर्जा आणि पाठबळ लाभणार आहे. अखेर बालविवाह संपुष्टात आल्याने इतकी वर्षे आम्ही ज्या लढाईत होतो ती संपण्याच्या मार्गावर आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news