लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावेत. शेतक-यांना नुकसानाची तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी सेनेच्यावतीने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदन केली आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर जिल्ह्यातील शहरात व सर्व तालुक्यात ब-याच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेले आहे. तर काही ठिकाणी झाडे पडून घरे उध्द्वस्त झाले आहेत. शेतातील फळबागे भाजीपाला ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील जनावरांचे गोटे कोसळले आहेत. तर काही ठिकाणी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. वीज पडून अनेक शेतक-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, काही भागात घरात पाणी गेल्या कारणाने घरातील संसार उपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्याने सर्वसामान्य नागरिकावर अडचण निर्माण झाली आहे. तसेच नदीकाठच्या जमिनीचे पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले आहे.
तसेच शहरातील आणि इतर सर्व तालुक्यातील व्यापा-यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरामध्ये घराबाहेर लावलेल्या गाड्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. व काही पाण्यामध्ये असल्याकारणाने खराब झाल्या आहेत. पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीचा गांभीर्याने विचार करून लातूर जिल्ह्यातील शहरातील सर्व तालुक्यातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतक-यांना व सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ मदत करून आधार देऊन नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशा या मागणीचे निवेदन संभाजी सेनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष मदन पाटील, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल कांदे, जिल्हा संघटक सिद्धाजी माने, जिल्हा उपाध्यक्ष बंकटी दत्त, जिल्हा कार्याध्यक्ष विद्यार्थ्या आघाडी हनुमंत बारलेकर, जिल्हा सचिव गजू मुंगळे, जिल्हा सहसचिव एकनाथ काळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत माने, विद्यार्थी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद पवार, जिल्हा सचिव बालाजी घोडके, शहर प्रमुख किरण मुक्तापुरे, मंगेश निकम, कैलास कांबळे, केशव कदम, रितेश चव्हाण, ओमकार पांचाळ, ऋतिक मनगुळे, अनेक इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.