कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत देशात भाजप विरोधात वातावरण झपाट्याने होत असल्याने पीएम मोदी यांची घबराट होत आहे. म्हणून त्यांना मुस्लिम विरोधात बोललो, तर हिंदू एक होतील असे वाटते, पण असे होणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना पीएम मोदी यांच्या भाषणांवरून जोरदार टीका केली. मोदी महागाई, बेरोजगारीवर बोलत नसल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, देशात भाजपाविरोधात वातावरण असल्याने इंडिया आघाडीचा मोठा विजय होईल. महाविकास आघाडीने लोकांचे नाते जपले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे देशाच्या संविधान विरोधात असल्याचे ते म्हणाले. भाजपची पातळी आणखी खाली जात असल्याची टीका त्यांनी केली.
अशी भाषा पंतप्रधान पदाला शोभणारी नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार केलेल्या वक्तव्यावरूनही थोरात यांनी सडकून टीका केली. शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य महाराष्ट्राचे जनता मताच्या रूपाने फिरवेल, असे त्यांनी सांगितले. अशी भाषा पंतप्रधान पदाला शोभणारी नाही, सत्ता जात असल्याचे समोर येत असल्याने अशी वक्तव्य समोर येत आहेत.