Homeमहाराष्ट्रसोलापुरात लवकरच आयटी पार्क सुरू करू

सोलापुरात लवकरच आयटी पार्क सुरू करू

जिल्ह्याला वाढवण बंदराशी जोडणार : मुख्यमंत्री
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे अध्यात्मिक महत्त्व खूप आहे. पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यामुळे केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचे रुप बदलेल, असा विकास करू. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचे काम आम्ही करणार आहोत असे सांगतानाच लवकरच येथे आयटी पार्कही सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. उजनीच्या पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठीही आपण काम करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच पंढरपूर कॉरिडोअरसंदर्भात व्यापा-यांना विश्वास देत, तुमचा धंदा १० पट वाढेल, असे सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौ-यावर होते. बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांनी महापूजा केली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे. या सगळ््यांनी मिळून हा विजय खेचून आणला, हा विजय विकासाचा विजय, विकासाच्या मुद्यावर ज्यांचा विश्वास, त्यांचा विजय आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना सांगतो की, अनेकांना वाटते, माझ्यामुळेच मी निवडून आलो. त्यामुळे त्यांचा व्यवहार बदलत जातो. लोक जसा तुमचा विकास पाहतात, तसा तुमचा व्यवहारही पाहतात.

भाजपची परीक्षा ही मोदींनी कामे केले, यावर होणार आहे, पण स्थानिक व्यवहारावरुनही होणार आहे. आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, एखाद्याचे पद गेले तरी चालेल, चांगल्या कामाशी देवाभाऊ पाठीशी. पण चुकलात तर चुकीला माफी नाही, असेही फडणवीसांनी सोलापुरातील नवनिर्वाचित सदस्यांना ठणकावून सांगितले.

आधुनिक रेडिमेड
गारमेंट पार्क करू
सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क तयार करू, सोलापूरसाठी पाणी आम्ही आणले, आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना केली, असे सांग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच आयटी पार्क सुरू करून शिकलेल्या लोकांना इथेच काम द्यायचा प्रयत्न आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR