36.9 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रआखिर कहना क्या चाहते हो राज?

आखिर कहना क्या चाहते हो राज?

दमानियांचा राज ठाकरेंना सवाल

नाशिक : मनसेचा पाडवा मेळावा मंगळवारी पार पडला. यामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसाठी एनडीएला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले पण आता त्यांच्या या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केले आहे. आखिर कहना क्या चाहते हो? असा सवाल राज ठाकरेंना केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, राज ठाकरेंचे भाषण जर आपण ऐकले तर ते सैरभैर झालेले दिसले. त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली. नोटाबंदीवर बोलले, रोजगार नाही यावर बोलले. एकीकडे बोलले मोदींचं काम ठीक नव्हतं म्हणून २०१४-१९ मध्ये मी टीका केली. मला खुर्ची नको होती. त्यातच ते मध्येच एखादा टोला उद्धव ठाकरेंनाही मारत होते.

यामध्ये ते फक्त आपल्या भूमिकांचे जस्टिफिकेशन देत होते. मध्येच त्यांनी मीडियावर एक टोमणा मारला. जसे राज ठाकरे एरवी बोलतात, तसे कालचे भाषण नव्हते. त्यांच्या भाषणात काही कॉमेडी असते तसेही त्यांचे नव्हते, ते गोंधळलेले वाटत होते त्यामुळे मी भाषणानंतर ट्वीटही केले होते की, आखिर कहना क्या चाहते हो? त्यांना नक्की काय म्हणायचे होते हेच लोकांना कळेना, असंही दमानिया यांनी म्हटले आहे.
एवढ्या लांबून त्यांचे कार्यकर्ते काल आले होते पण त्यांचं भाषण पहिल्यांदाच अगदी छोटेसे भाषण झाले. हे भाषण ऐकून मनसेचे कार्यकर्ते देखील नाराज झाले असतील. काल त्यांनी भाजपला पाठिंबा दिला पण आधीच ते दोन-तीन वेळा म्हणाले की, राजकारणातील व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका.
पण त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळं त्यांच्या मागे ईडीचे चक्र होतं म्हणूनच त्यांनी पाठिंबा दिला का? असा प्रश्नही मनात येतो. पण हा बिनशर्त पाठिंबा देताना कारण काहीच नव्हते. कारण तुम्हाला लोकसभेची खुर्ची नाही, राज्यसभा नाही. तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. इतके काही सध्या लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR