श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेटकडे जाणारा रस्त्यावर एकमेव असलेल्या पूलाचे बांधकाम व्यवस्थित झालेले नसल्याने या नाल्याला अनेक नाले जोडलेले असल्याने या नाल्यात सततच्या पावसाने पूर आला त्यामुळे पुल तुटून रस्ता बंद झाला असून उमरा- मेट कडे जाणारा रस्ता बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. सिंदखेड गावाला तिन्ही बाजूने घेरुन असलेल्या नाल्यालाही पूर आल्याने गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माहूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्ग महामार्ग क्रमांक १६१ अ वर माहूरपासून दहा किमी अंतरावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेट कडे जाणा-्या रस्त्यावर एकच पूल असून या नाल्याला मोठे पूर येतात बांधकाम व्यवस्थित झाले नसल्याने तसेच या नाल्याला अनेक छोटे मोठे नाले जोडलेले असल्याने अचानकपणे या नाल्यालां पूर येतो सततच्या पावसामुळे अचानकपणे पूर आला पुलाच्या खालील जागेत कचरा व झाडेअडकल्याने पाणी पुलावरून गेले त्यामुळे एकीकडचा फुल तुटला त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक दि. ३० जुलै रोजी दुपारपासून बंद झालेली आहे.
मौजे सिंदखेड गावाला तिन्ही बाजू ने मोठ्या नाल्याने घेरलेले असून या नाल्यात मनीराम थड प्रकल्पाचे पाणी नाल्यातून जात असल्याने गावाला पुरामुळे धोका होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. मौजे मेटकडे जाणा-या रस्त्यावरील पूल तुटल्याने मेट कडे जाणारा एकमेव रस्ता बंद झाल्याने संबंधित विभागांनी तात्काळ नाल्याची पाहणी करून रस्त्याची व्यवस्था करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
किनवटमध्ये तरूण वाहून गेला
किनवट तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून यात आंदबोरी, पांगरपहाड, अप्पारावपेठ, रेवानाईक तांड्याचा संपर्क तुटला असून या दरम्यान, कंचली येथील ३२ वर्षीय राजू रेड्डी दांडेलु हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुदैर्वी घटना २९ जुलै बुधवार रोजी चार वाजेच्या दरम्यान सायंकाळी घडली. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील कंचली ग्रामपंचायतीत सेवक म्हणून कार्यरत असलेले राजू दांडेलु हे कंचली येथून रेवा नाईक तांड्याकडे जात असताना कंचली गावालगत असलेल्या कंचली आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून वाहणा-या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. परंतु गुरूवारी सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेहाचा शोध लागला नाही.
















