कळंब : सतीश टोणगे
धाराशिव जिल्ह्यात पवन राजे निंबाळकर यांची हत्या झाल्यापासून राजकारणही सूडाने पेटले आहे. एकेरी भाषा, शिवी गाळआरोप प्रत्यारोप हे तर नित्याचेच आहे. विकास हा मुद्धा बाजूला ठेवून, भावकी ची भांडणे चव्हाट्यावर येत आहेत….प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. दहा तालुके, सहा विधानसभा मतदार संघ, तेरा शहरे यात एकोणीस लाख मतदार आहेत. एवढ्या मोठ्या मतदार संघात , प्रचार करताना सौ. अर्चनाताई पाटील व ओमराजे निंबाळकर यांचे कुटुंब रस्त्यावर आहे.
महिला मंडळ सुद्धा मागील उणी दूने काढत आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या मातोश्री आनंदी देवी निंबाळकर यांनी प्रचार केला असून मतदारांना भावनिक साद घातली आहे. माझ्या पतीची हत्या करून, माझे कुंकू पुसले आहे, त्याचा बदला घेण्यासाठी ओमराजे यांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले जात आहे. मुलासाठी आई रिंगणात उतरल्याने, महिला वर्गात भावनेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. तर दुसरी कडे सौ. अर्चनाताई पाटील यांनी ही तेरणा कारखाना भंगारात विकल्याचा आरोप करून शेतक-याच्या जीवाशी खेळले गेल्याचा आरोप करत आहेत. या कारखण्याच्या चेअरमन आनंदी देवी निंबाळकर होत्या त्यांना ही लक्ष केले जात आहे. एकंदर विकास हा मुद्धा नसल्याने मतदार कोणत्या मुद्द्यावर प्रचार करनार याची चर्चा होऊ लागली आहे.