बीड : लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत जिंकून देण्याचेही आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या बीडमधील भाषणाची सध्या खूपच चर्चा होत आहे.
पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. अशातच त्यांनी बीडच्या चिंचाळा गावात सभा घेतली होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, लोकांनी ठरवले तर काही चमत्कार होऊ शकतो. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत जिंकून देण्याचेही आवाहन त्यांनी केले.