33.2 C
Latur
Monday, June 3, 2024
Homeराष्ट्रीयपंजाबपासून बंगालच्या उपसागरात विषारी हवा पसरली

पंजाबपासून बंगालच्या उपसागरात विषारी हवा पसरली

नवी दिल्ली : उत्तर भारतातील लोकांना श्वास कोंडणाऱ्या हवेत जगावे लागत आहे. दिल्ली-एनसीआरमधील वातावरण सध्या गॅस चेंबरमध्ये असल्यासारखे झाले आहे. या परिस्थितीसाठी शेतकऱ्यांनी जाळलेल्या कचऱ्यापासून ते वाहनांचे प्रदूषण आणि कारखान्यांमधून होणारे प्रदूषण या सर्व बाबींना जबाबदार धरले जात आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमधील शाळा पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीत लवकरच सम-विषम योजनेअंतर्गत वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, नासाने इमेजस प्रसिद्ध करून हे प्रदूषण केवळ उत्तर भारतातच नाही तर बंगालच्या उपसागरापर्यंत पसरल्याची माहिती दिली आहे.

नासाचा डेटा दर्शविते की, शेतातील कचऱ्याला आग लावण्याच्या घटनांमध्ये २९ ऑक्टोबरपासून झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबर २९ रोजी १,०६८ घटनांसह यामध्ये ७४० टाक्यांची वाढ झाली. चालू हंगामातील एका दिवसातील हा उच्चांक आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारांना शेतातील कचऱ्याला आग लावण्यापासून रोखण्यासाठी केंद्राशी त्वरित चर्चा करण्यास सांगितले आहे.

येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील लोकांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. दिल्लीमध्ये खूप हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, वाऱ्याची दिशा सोमवारी नैऋत्येकडे आली आणि मंगळवारी उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडे बदलली. जेंव्हा वारे दक्षिण-पूर्व दिशेला वाहतील, तेंव्हा पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी कचऱ्याला लावलेल्या आगीचा परिणाम राष्ट्रीय राजधानीतील विद्यमान प्रदूषण पातळीत वाढ करणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR