25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeराष्ट्रीयअहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

मृतांचा आकडा २७० वर, ९ मृतदेहांची ओळख पटली
केंद्र सरकारने केली घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू होता तर अनेक जण जखमी झाले होते. जखमींवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू होते. दरम्यान, आता मृतांचा आकडा २७० वर पोहोचला असून, आतापर्यंत ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आता उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केंद्र सरकारने आज केली. या समितीचे नेतृत्व केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे असणार आहे. ही समिती ३ महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.
विमान अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती ही केवळ एअर इंडियाच्या एआय-१७१ विमान अपघाताचीच चौकशी करणार नाही तर भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी भारतीय विमान उड्डयन विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले टाकायला हवेत, यासंबंधीही शिफारशी करणार आहे. ही समिती देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे केंद्र सरकार एक लिखित आदेश जारी करेल. जेणेकरून भारतीय विमान उड्डयन विभाग अधिक सुरक्षित बनण्यास मदत होईल.
एअर इंडियाच्या विमानाने दि. १२ जून रोजी दुपारी अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतले होते. परंतु टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले. या विमानात पायलट, क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. एक प्रवासी वगळता २४१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे विमान नागरी वस्तीत म्हणजेच बी. जे. वैद्यकीय कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकल्याने कँटिनमध्ये जेवण करणारे जवळपास २४ भावी डॉक्टरही दगावले. त्यामुळे मृतांचा आकडा २६५ वर गेला होता. त्यातच हॉस्टेल आणि परिसरातील अनेकजण जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांचा आकडा २७० वर पोहोचला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR