35.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया-भारत यांच्यात अंतिम लढत

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यात अंतिम लढत

बेनोनी : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील १९ वर्षाखालील वर्ल्डकपचा सेमी फायनल सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने १६ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला १७९ धावात रोखले होते. मात्र, हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद १६४ धावा अशी झाली होती.

ऑस्ट्रेलियाकडून हॅरी डिक्सनने ५० तर ओली पीकने ४९ धावा केल्या. राफ मॅकमिलननने नाबाद १९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ११ फेब्रुवारीला विजेतेपदासाठी लढत होणार आहे. भारतात नुकतेच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणा-या ऑस्ट्रेलिया संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाचा पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी उदय सहारनच्या नेतृत्वाखालील युवा संघाकडे असणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR