Homeलातूरजिल्ह्यात ३५ खासगी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यात ३५ खासगी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ७ मे रोजीच्या दैनंदिन अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात २ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच जिल्ह्यात ३५ विहीर, विंधन विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जळकोट तालुक्यातील ३ गावे आणि १ वाडी मिळून ३,३१० लोकसंख्येला २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शिवाजी नगर तांडा व वाघमारी तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. गव्हाण येथेही २४ एप्रिल २०२६ पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी २ शासकीय टँकरद्वारे दररोज ४ खेपा पूर्ण केल्या जात आहेत.
टँकर व्यतिरिक्त  ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे प्रशासनाने खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्हभरात ३५ खाजगी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये औसा तालुक्यातील १० गावे तथा वाड्यांसाठी ११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, तर अहमदपूर तालुक्यातील १० गावांमध्ये १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.  उदगीर तालुक्यात ८ गावे तथा वाड्यांसाठी ८ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. रेणापूर व चाकूर तालुक्यात प्रत्येकी १ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे, तर जळकोट तालुक्यात टँकर भरण्यासाठी ३ आणि इतर २ अशा एकूण ५ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR