31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरदेशातील जनतेचे भविष्य घडविण्यासाठीची ही निवडणूक - दिलीपराव देशमुख

देशातील जनतेचे भविष्य घडविण्यासाठीची ही निवडणूक – दिलीपराव देशमुख

लातूर : प्रतिनिधी
आज आपण लातूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी एकत्र आलो आहोत. ही केवळ लोकसभा निवडणुक आहे एवढं मानण्यापेक्षा  देशातील   सव्वाशे कोटी  जनतेचे भविष्य घडविण्यासाठीची,आपल्या भावी पिढीचे चांगले भविष्य बनविण्यासाठीची निवडणूक आहे. तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना भरघोस मताने विजयी करावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जवळा(बु) येथील जाहीर सभेत बोलताना केले.
रविवार दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी लातूर मतदारसंघातील जवळा (बु) या ठिकाणी जाहीर प्रचार सभा सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य व लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातुर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या समवेत पार पडली. या सभेच्या प्रारंभी आदरणीय लोकनेते माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना सहकार महर्षी माजी मंत्री दिलापराव देशमुख म्हणाले की, विद्यमान सरकारने आपल्याला अच्छे दिन आएंगे असे म्हटले पण आपल्या कडून घेऊन या सरकारने आपल्याला काहीच न देता दोघा उद्योग पतीचे खिसे भरले, भारतात सोयाबीनला भाव नाही आणि देशाच्या बाहेरून सोयाबीन तेल आयात केले जात आहे, महागाई कमी न करता उलट गगनाला भिडली तरी यांचे देशातील सर्व सामान्य माणसाकडे अजिबात लक्ष नाही.
पंतप्रधान म्हणतात मी भ्रष्टाचारी लोकांना सोडणार नाही पण याच भ्रष्टाचारी लोकांना हे शेजारी घेऊन बसले आहेत.ज्या लोकांना यांनी भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले त्यांना मंत्री केले यावरून स्पष्ट होते की विद्यमान सरकारच्या करणी आणि कथनी मध्ये फरक आहे. यांच्यात कांही बदल होईल असे सद्या तर दिसत नाही आणि या सरकारने फुगवून दाखविलेला फुगा आता फुटला असून या सरकारने केवळ फोडा फोडी केली, सरकारे पाडली, उद्योग पतीचे खिसे भरले आणि म्हणूनच आता आपण सावध व्हावे आणि बोगस बियाणांच्या नादी न लागता डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने आपणास मिळालेले सकस बियाने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने आपल्या समोर आणले असून आपण मजबुतीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि विरोधी उमेदवारांची अनामत जप्त होईल एवढे भरघोस मतदान डॉ. शिवाजी काळगे याना देऊन निवडून आणावे असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्वांना केले.
दरम्यान या वेळी जवळा(बु) सह काटगाव, गाधवड सह परिसरातील उपस्थित सर्वांनी  डॉ.शिवाजी काळगे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या जाहीर प्रचार सभेसाठी तालुकाध्यक्ष सुभाष घोडके,अ‍ॅड. समद पटेल, रवींद्र काळे, अनंत बारबोले, जयचंद भिसे, आबासाहेब पाटील, चनबस भुजबळ, मदन भिसे, लक्ष्मण पाटील, अनिल पाटील, मनोज कापरे, अरुण कापरे, अनुप शेळके, सौ. दैवशाला राजमाने ताई, अ‍ॅड. गुरुनाथ अप्पा ब्याळे, जगदीश बावणे, धनंजय तात्या देशमुख, कैलास पाटील, डॉ. अशोक पोद्दार, किशनराव रुपणे, सिद्धेश्वर लाटकर, रामभाऊ राजमाने, बबन ढगे, गजानन पाटील, कालिदास देशपांडे, अशोक काळे, भैरवनाथ सव्वाशे, दत्ता शिंदे, संभाजी सुळ, चाँद पाशा इनामदार यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR