पुणे : दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. १० वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झाले आहे की नाही. जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणे कठीण झाले आहे. पीएफआयवर प्रतिबंध लावला, असेही मोदींनी यावेळी सांगितले. ते पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते.
देशात कधीच धर्मांच्या आधारावर आरक्षण लागू होऊ शकत नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाचे विभाजन करण्याचे काम भारत आघाडी करत आहे. पण मोदी अजूनही जिवंत आहेत. मोदी हे होऊ देणार नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुण्यात रक्तस्त्राव झाला होता. मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, काशीत व्हायचे. पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.
१० वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झाले आहे की नाही. जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणे कठीण झाले आहे. हा मोदी आहे, घरात घुसून मारेल, अशा कडक शब्दात मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.
मला फक्त दहा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावेळीच्या बजेटमधे एक लाख कोटी रुपये इनोव्हेशनसाठी दिलेत. पुण्याला याचा फायदा होईल. आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचारचा टॅक्स वसूल केला असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.