33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरभाजपाच्या भुलथापांना बळी न पडता काँग्रेसचे हात बळकट करा

भाजपाच्या भुलथापांना बळी न पडता काँग्रेसचे हात बळकट करा

लातूर : प्रतिनिधी
मोदी सरकारने पहिल्या पाच वर्षात सांगीतले होते कि, युवक युवतींना  दोन कोटी नोक-या देणार आहोत. त्यानंतर म्हणाले बाहेरील काळा पैसा आणून देशातील गोरगरीब, शेतक-यांच्या खातावर १५ लाख टाकु आजपर्यत गोरगरीबांना, शेतक-यांना एकही रुपया मिळाला नाही. असे खोटे आशवासन देवून आपल्या भोळ्या जनतेला फसवण्याचे काम या सरकारने केले आहे. आता जनतेला माहीत आहे. मोदी सरकार फक्त थापा मारत आहे. त्यामुळे यांच्या भुल थापांना बळी न पडता कॉग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील एकुरगा येथे दि. २९ एप्रिल रोजी सकाळी नारायणराव पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित महिला मेळाव्यात श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. यावेळी सीमा सिरसागर, सुनिता अरळीकर, एकुरगा गावच्या सरपंच विठ्ठाबाई काशिंदे, सुजाता आडसुळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोदी सरकाने वर्षाला दोन कोटी नोक-या दिल्या जातील, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करु, युवा वर्गाला नोकरी देवू अशी आश्वासने सरकाने दिलेली होती. परंतू, यातील एकही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट शेतक-यांचा शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. गोर गरीबांची फसवणूक केली जात आहे, असे नमुद करुन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, या भाजपाच्या लोकांनी शेवसेना पक्ष आणि राष्टवादी पक्षाचे घर फोडले आहे. आणि आपली सत्ता केंद्रात स्थापन केली. त्याच बरोबर गोर गरीब, शेतकरी, महिला, युवक, युवती यांची फसवणूक केली आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कॉग्रेस पक्षाचे हात बळकट करावे लागेल.
सरकारने नोट बंदी करुन सामान्य जनतेची दिशाभुल करत फसवणून केली. या मोदी सरकारने सामान्य नागरीकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. काँग्रेस महाविकास आघाडीने एक सुशिक्षत आणि कार्यक्षम उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने आपल्याला मिळाला आहे. डॉ. शिवाजी काळगे हे महिन्यातील एक दिवस मतदारसंघातील तालुक्यातील लोकासांठी देणार आहेत. काँग्रेस पक्षाने सर्वना गॅरंटी कार्ड दिले आहे. यात शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, बेरोजगारी यांच्याविषयी गॅरंटी दिली आहे.
महिलांना दरमहा ८ हजार पाचशे, युवकांना पक्की नोकरी, शेतक-यांना शेतमालाची हमी घेतली आहे. या गॅरंटी कार्डवर स्वत: राहूल गांधी यांची स्वाक्षरी आहे. काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता येताच गॅरंटीची पुर्तता केली जाणार आहे. त्यामुळे महिला भगिणींनी आपल्या परिवारासह डॉ. शिवाजी काळगे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावयाचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सुनिता अरळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मीरा पटाडे, विजयाबाई कोरले, कविता घुटे, प्रभावती नाटकळे, कोमल नाटकळे, प्रभा इंगळे, सगिता पटाडे, मनिषा घुटे, सिंधूबाई घुटे, पकंज पटाडे, दिनकर इंगळे, विठ्ठुबा घुटे, विष्णू पटाडे, महादेव नाटकळे, नंदु नाटकळे, विश्वनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन आणि आभार नारायनराव पाटील यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR