सतीश टोणगे : कळंब
लोकसभा निवडणुका झाल्या नंतर विधानसभा निवडणुका पूर्वी जिल्हा परिषद, न.प. च्या निवडणुका लागतील अशी आशा कार्यकर्त्यांना वाटत असल्याने, हिच रंगीत तालीम समजून भर उन्हात प्रचार चालू आहे. आपापल्या प्रभागात , गावात जास्त मते कशी मिळतील या साठी प्रयत्न करू लागले आहेत.
लोकसभेच्या उमेदवारा सोबत पदाधिकारी तसेच येणा-या गाव पातळीवरील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्याची ही संधी आली असल्याने सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत. सोबत पक्षाचा जाहीरनामा देत फिरत आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, अन्य निवडणुका झालेल्या नाहीत त्या मुळे आता काम केले तर नेते मंडळी तिकीट देतील अशी आशा असल्याने भर उन्हात हि मंडळी मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत.
निवडणुका लागतील म्हणून, असे कार्यकरत्यात बोलले जात आहे. काही हि असो सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मात्र जीवाचे रान करताना दिसत आहेत.निवडून आल्यावर नेत्यांनी तूमच्या मुळेच निवडणूक जिंकता आली एवढे म्हणले तरी , बारा हत्तीच बळ येईल .दुसरी काय अपेक्षा असते.