24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयदेशात योगदिन उत्साहात

देशात योगदिन उत्साहात

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’मधून माहिती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १२३ व्या भागात देशाला संबोधित केले. एपिसोडच्या सुरुवातीला त्यांनी योग दिनाबद्दल सांगितले. ते म्हणाले २१ जून रोजी देश आणि जगातील कोट्यवधी लोकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात भाग घेतला.

पंतप्रधान म्हणाले यावेळी आम्हाला योग दिनाचे आकर्षक फोटो दिसले. विशाखापट्टणममध्ये ३ लाख लोकांनी एकत्र योगा केला. आपल्या नौदलाने जहाजांवर योगा केला आणि जम्मूमध्ये लोकांनी जगातील सर्वात उंच पुलावर योगा केला. वडनगरमध्ये २१०० लोकांनी एकत्र भुजंगासन करून विक्रम केला. पंतप्रधान पुढे म्हणाले आणीबाणीच्या काळात लोकांवर अत्याचार झाले.

अनेकांना क्रूर छळ देण्यात आले. एमआयएसएअंतर्गत, कोणालाही अशाच प्रकारे अटक करता येत होती. त्यांच्यावर असे अमानुष अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला आणि आणीबाणी उठवण्यात आली. जनतेचा विजय झाला आणि आणीबाणी लादणारे हरले. भारत ट्राकोमा मुक्त झाला. मी तुम्हाला अशा दोन कामगिरींबद्दल सांगू इच्छितो ज्या तुम्हाला अभिमानाने भरून टाकतील. पहिली कामगिरी आरोग्याशी संबंधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ट्राकोमा मुक्त घोषित केले आहे.

हे यश आपल्या आरोग्य कर्मचा-यांचे आहे आज, जेव्हा नळाचे पाणी प्रत्येक घरात पोहोचत आहे, तेव्हा अशा आजारांचा धोका कमी झाला आहे. ९५ कोटी लोक सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेचा अहवाल आला आहे. देशातील ९५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. या यशामुळे येणा-या काळात भारत अधिक सक्षम होईल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मित्रांनो, देश जनसहभागाने पुढे जात आहे.

कैलास हे श्रद्धेचे केंद्र
धार्मिक तीर्थयात्रा ही एक महान सेवा आहे. यात्रेला जाणा-या लोकांपेक्षा जास्त लोक यात्रेची सेवा करण्यात सामील होतात. ब-याच काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन सभा परंपरांमध्ये कैलास हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते.

मेघालयाला जीआय टॅग मिळाला
मन की बातमध्ये आपण देशातील अनोख्या उत्पादनांबद्दल बोलतो. काही दिवसांपूर्वी मेघालयाच्या एरी सिल्कला जीआय टॅग मिळाला. या रेशीममध्ये असे अनेक गुण आहेत जे ते इतर कापडांपेक्षा वेगळे बनवतात. ते बनवण्यासाठी वापरले जाणारे रेशीम किडे मारले जात नाहीत. त्याची खासियत अशी आहे की ते हिवाळ्यात उबदारपणा आणि उन्हाळ्यात थंडपणा देते.

बोडोलँडमध्ये ७० हजार फुटबॉल खेळाडू
बोडोलँड आज आपल्या नवीन रूपात देशासमोर उभा आहे. बोडो टेरिटोरियल एरियामध्ये ३ हजारांहून अधिक संघ आणि ७० हजारांहून अधिक खेळाडू फुटबॉल खेळत आहेत. एक काळ असा होता जेव्हा बोडोलँड संघर्ष करत होता. आज येथून येणारे फुटबॉल खेळाडू आपली छाप पाडत आहेत.

पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक मित्र निघाले
या महिन्यात आम्ही जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. अनेकांनी आम्हाला त्यांच्या मित्रांबद्दल सांगितले जे पर्यावरण वाचवण्यासाठी एकटे निघाले. पुण्यातील रमेश खरमाडे जी जुन्नरच्या टेकड्यांकडे निघाले. ते झुडपे साफ करतात आणि पाणी अडवण्यासाठी खंदक बनवतात. परिणामी, येथील वन्यजीवांना एक नवीन श्वास मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR