११ वर्षांत जवळपास १.९२ लाख हेक्टर जंगल नष्ट झाली

नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी प्रतीकात्मक उपाय सुचवत असताना त्यांच्या सरकारच्या काळात हिंदुस्थानच्या पर्यावरणीय संपत्तीवर मोठ्या प्रमाणात आघात झाल्याचा आरोप त्यांनी केला.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये खरगे यांनी दावा म्हटले की, गेल्या ११ वर्षांत देशभरात जवळपास १ लाख ९१ हजार ९२२ हेक्टर जंगल क्षेत्र नष्ट झाले आहे. तसेच २०१४ पासून आतापर्यंत अंदाजे १.६ कोटींहून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे सरकारचे पर्यावरण संरक्षणाचे दावे आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी म्हटले. देशभरातील विविध प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचाही आरोप खर्गे यांनी केला. अंदमान-निकोबारमधील ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे सुमारे १० लाख झाडे धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे सुमारे ७ लाख झाडे नष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला.

छत्तीसगडमधील हसदेव अरण्य कोळसा प्रकल्पामुळे सुमारे ५ लाख झाडे तोडली जाणार असून जैवविविधतेने समृद्ध असलेल्या परिसराला त्यामुळे मोठा फटका बसणार असल्याचे खरगे म्हणाले. राजस्थानमध्ये विविध विकास प्रकल्पांमुळे १.५ ते ४ लाख झाडे धोक्यात असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशात महामार्ग आणि द्रुतगती मार्गांच्या उभारणीसाठी सुमारे १ लाख झाडे तोडण्यात आली आहेत. आसाममध्ये गेल्या चार वर्षांत महामार्ग विस्तारासाठी सुमारे १ लाख झाडे तोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला. ओडिशामधील भारतमाला प्रकल्पामुळे ५० हजार झाडांची कत्तल झाली असून महाराष्ट्रात किनारी रस्ता प्रकल्प आणि खाणकामामुळे सुमारे ४५ हजार झाडांसह महत्त्वाच्या खारफुटी परिसंस्थेलाही फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले.
मोदी सरकार वनक्षेत्र वाढल्याचा दावा करत असले तरी ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’मध्ये वापरण्यात येणा-या वनक्षेत्राच्या व्याख्येवरही खर्गे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपग्रहांच्या आधारे झाडांची घनता मोजताना नैसर्गिक जंगलांसोबत रबर, तेलपाम, बांबू लागवड तसेच फळबागांचाही समावेश केला जात असल्याने प्रत्यक्षातील जंगल नष्ट होण्याचे चित्र लपवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

इंदिरा गांधींनी मजबूत चौकट उभी केली होती
खरगे यांनी पुढे म्हटले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, जल कायदा १९७४, वन संवर्धन कायदा १९८० आणि वायू कायदा १९८१ यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांद्वारे पर्यावरण संरक्षणाची मजबूत चौकट उभी करण्यात आली होती. त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात वनहक्क कायदा २००६, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अधिसूचना २००६, राष्ट्रीय हरित लवाद २०१० आणि हवामान बदल कृती आराखडा २००८ यांसारख्या उपाययोजनांमुळे ही चौकट अधिक बळकट करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news