लातूर : प्रतिनिधी
कधी नव्हे ते ‘नीट’ पेपरफु टी प्रकरणात लातूरचे नाव आले आणि ब्रँडनेम ‘लातूर पॅटर्न’च्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले. पेपरफु टीमुळे चक्क परीक्षाच रद्द करावी लागली होती. पेपरफु टीच्या डागामुळे विद्यार्थी व पालकांचा विश्वास डळमळीत होतो की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, दुस-यांदा ‘नीट’ची परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षेच्या निकालाने लातूरची गुणवत्ता बावन्नकशी सोनेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
खरे पाहिले असता ‘लातूर पॅटर्न’च्या निर्मितीत खाजगी कोचिंग क्लासेसचा तिळमात्रही वाटा नाही. लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यासह इतर महाविद्यालये तसेच उदगीर आणि अहमदपुरमधील काही शाळा व महाविद्यालयांनी खुप मेहनतीने ‘लातूर पॅटर्न’घडवला. मुळात ‘नीट’ पेपरफु टी प्रकरण घडले ते कोचिंग क्लासेसचालकांकडून. त्यामुळे गुणवत्तेचा ‘लातूर पॅटर्न’ आणि ‘नीट’ पेपरफु टी प्रकरण याचा दुराव्यानेही संबंध येत नाही. मात्र, ‘नीट’ पेपरफु टी प्रकरणानंतर ‘लातूर पॅटर्न’कडे संपूर्ण देशाने संशयाने पाहिले. परंतु, दूस-यांदा घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या परीक्षेत लातूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत ‘लातूर पॅटर्न’ची बावन्नकशी गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या विश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत ‘लातूर पॅटर्न’ची विश्वासार्हता कायम ठेवली आहे. गुणवत्तेच्या जोरावर ‘लातूर पॅटर्न’ उभा राहिला आणि तो गुणवत्तेच्याच बळावर पुढे जाईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यरांनी तसेच पालकांनी व्यक्त केला आहे.
















