उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ च्या गळीत हंगाम २०२६-२७ वेळेवर अणि पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी तांत्रीक कामे केली जात आहेत. यांच तयारीचा एक भाग म्हणुन बुधवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या मिल रोलरचे पुजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख अणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत विधीवत मिल रोलर पुजन करण्यात आला. या पुजनानंतर संचालकांच्या उपस्थीतीत गळीत हंगाम तयारी बाबत आढावा बैठकही घेण्यात आली.
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा पालक मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्या दृष्ट्रीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या अनुष्ंगाने सर्व हंगामपुर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची काम प्रगतीपथावर असुन, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्यासाठी सक्षम नियोजन करण्यात येत आहे.
आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे १५ हजार हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असुन, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणी यंत्रणाद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता १०० टक्के ऊस तोडणी यंत्रणाद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक आसणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. या हंगामात तांत्रिक कारणामुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरु असलेली मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असुन, लवकरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल अशी कारखान्याचे कार्यकारी संचालक ए.आर. पवार यांनी माहिती दिली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे नियोजन तसेच कारखान्याचे संस्थापक, राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस उत्पादकांना प्रति मे. टन रु. ३१३१ इतका उच्चाकी दर दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या विक्रमी दरामुळे शेतक-यांच्या अर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असुन, कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
मील रोलर पुजन कार्यक्रमास माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे कार्यकारी संचालक ए. आर. पवार संचालक, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, रसुल पटेल, सुभाष माने, तात्यासाहेब पालकर, रंजित पाटील, गार्वधन मोरे, दिपक बनसोडे, नेताजी साळुंखे, अमृत जाधव, सतिष शिंदे, लताबाई देशमुख, निमंत्रीत संचालक कल्याण पाटील, पंडीत ढगे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, मारोती पांडे, उदगीर तालुका कॉग्रेस अध्यक्ष संतोष बिरादार व खातेप्रमुख , विभागप्रमुख, कर्मचारी व कामगार यांची मोठया संख्यने उपस्थिती होती.
















