मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? : राज ठाकरे

माणगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (९ ऑगस्ट) सकाळी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. माणगावला महामार्गाचे काम पाहिल्यानंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. १५ वर्षांपासून ऐकतोय मुंबई-गोवा महामार्ग होणार आहे. हा महामार्ग कधी पूर्ण होणार, कोकणवासीयांचे हाल कधी संपणार, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याबद्दल राज ठाकरे यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला. राज ठाकरे मनसे शाखांचे उद्घाटन आणि मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते.

यावेळी त्यांनी रखडलेल्या महामार्गावरून सरकारला लक्ष्य केलेच शिवाय तिस-या मुंबईवरूनही सरकारवर टीकेचे बाण सोडले. तिसरी मुंबई कुणासाठी बनवली जात आहे? असा सवाल त्यांनी केला. सरकार स्थानिकांशी चर्चा करतंय का? बाहेरचे लोक आणायचे आणि त्यांना पोसायचे, हेच सुरू आहे. त्यांच्यासाठी तिसरी मुंबई बनवली जात आहे. यावेळी तिस-या मुंबईत काय काय येणार, याची राज ठाकरे यांनी यादी वाचली आणि हे पेण, पनवेल, उरणमधील लोकांना-युवकांना माहीत आहे का, इथं कोणता विकास होतोय, याची स्थानिकांना कल्पना आहे का, असे सवाल त्यांनी केले. यावरून जमिनी विकणे एवढाच धंदा महाराष्ट्रात सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या निमित्ताने एकदा नितीन गडकरी यांना विचारले होते. तेव्हा कंत्राटदार कंटाळून जातात, असे उत्तर गडकरी यांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावरून राज ठाकरे यांनी गडकरींनाही सवाल केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार का कंटाळून गेले, याचे उत्तर तुम्हीच द्यावे, असे सुनावले आहे. या महामार्गावरून सर्व लोकप्रतिनिधी एकत्र असते तर कधीच महामार्ग झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news