23.7 C
Latur
Tuesday, July 1, 2025
Homeराष्ट्रीयमंदिरापासून स्मशानभूमीपर्यंत सर्वांना समान अधिकार हवा!

मंदिरापासून स्मशानभूमीपर्यंत सर्वांना समान अधिकार हवा!

सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज गरज आहे ती समाजातील जातीभेद बाजूला सारून उभे राहण्याची आणि एक समरस आणि सर्वसमावेश राष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नागरिक घडवण्याचे आहे. आणि नागरिक घडवण्याच्या माध्यमातूनच कुटुंब, समाज, देश आणि अंतिमत: संपर्ू्ण मानवतेबद्दलच्या उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले.

दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांच्या भागात असलेल्या शाखांबद्दल आणि कामाबद्दलची माहिती घेतली.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, समाज असा असावा की, त्याला देशाबद्दलच्या जबाबदारी जाणीव असायला हवी. पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारा आणि जातीभेदातून मुक्त व्हा. मंदिर, पाण्याची ठिकाणे, स्मशानभूमी या सारख्या सार्वजनिक संसाधनांवर पूर्ण समाजाला समान अधिकार हवा. तीच खरी सामाजिक समरसता आहे, अशी भूमिका भागवत यांनी मांडली.

मोहन भागवत म्हणाले, प्रत्येक कुटुंबापर्यंत संघ गेला पाहिजे. आपण म्हणतो की, वसुधैव कुटुंबकम… विश्वच एक कुटुंब आहे. हीच भावना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याचा विस्तार समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR