22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र८३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपुर्द

८३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपुर्द

पुणे :  प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना दिला जाणारा एक लाख रुपयांचा निधी अन्य वाङ्मयीन उपक्रमासाठी वापरण्याचा निर्णय परिषदेने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सांगितली आहे.
पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाऊंडेशनने ८३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपुर्द केला. त्याच्या व्याजातून समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम राबविण्याबरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लाख रुपयांचा निधी ग्रामीण व दुर्गम भागातील विविध वाङ्मयीन उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील वाङ्मयीन चळवळींना बळ देण्यासाठी तसेच तिथल्या साहित्य संस्था व ग्रंथालये यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना मानधन, प्रवास-निवासाच्या खर्चाचा भार तिथल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणा-या संस्थांवर व संयोजकांवर पडू नये, हा निधी देण्यामागचा हेतू होता. तो साध्य होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले.

डॉ. जयंत नारळीकरांनी केला निधी परत
कोरोनाच्या संकट काळात कार्यक्रमांवर असलेल्या बंधनांमुळे तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत करत आहे, असे सांगून डॉ. जयंत नारळीकरांनी एक लाख रुपयांचा निधी परत केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR