31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये अपघातानंतर पिकअपने पेट घेतला; चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिकमध्ये अपघातानंतर पिकअपने पेट घेतला; चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
सिन्नरमध्ये भीषण अपघातामध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर पिकअपने पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमावरून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यात पंचाळेजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर पिकअपने पेट घेतला.

या अपघातामध्ये बाहेर फेकल्या गेलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांना पिकअपमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री या अपघाताची माहिती मिळताच सिन्नरच्या रुग्णवाहिका, सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री मदतकार्य केले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघे जण सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावातील रहिवासी होते. मृतांवर शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले.

मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. पिकअप चालक किरण रवींद्र मोरे (२५ वर्षे), शुभम गणेश नवले (२२ वर्षे), रिंकू शुभम नवले (१९ वर्षे), मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (३५ वर्षे) अशी मृतांची नावं समोर आली आहेत. सचिन गणेश नवले, सुनीता गणेश नवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR