Homeसोलापूरकिरकोळ घटना वगळता सोलापूर जिल्ह्यात शांततेत मतदान

किरकोळ घटना वगळता सोलापूर जिल्ह्यात शांततेत मतदान

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, साडेतीन वाजेपर्यंत ४७.६६ टक्के मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनुकीसाठी शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता जिल्हाभरात शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.६६% मतदान झाले होते.

जवळपास सात वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मात्र सकाळच्या वेळेत तो इतका वाटत नव्हता. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १९ टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी १२ नंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हाभरात ४७.६६% इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान बार्शी तालुक्यात एकूण ५१.५७% इतके झाले. सांगोला तालुक्यात ५१.०३%,उत्तर सोलापूर तालुक्यात ४८.६०%,माळशिरस तालुक्यात ४८.५०%,पंढरपूर तालुक्यात ४८.२५%, असे पहिल्या चार क्रमांकाचे मतदान झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात निच्चंकी ४३.१०% मतदान झाले. माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होत आहे. भाजपकडून पृथ्वीराज शिवाजीराव सावंत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. त्याशिवाय करमाळा तालुक्यातील रश्मी बागल, अक्कलकोट तालुक्यातील शाभावी कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, माळशिरस तालुक्यातील संस्कृती सातपुते आदींच्या लढतीकडे लक्ष असणार आहे.

मतदान यंत्रावर जादूटोणा?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील एका मतदान केंद्रावर एका मशीन पाशी जादूटोणा केळ्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून केला जात आहे. ईव्हीएम मशीन जवळ का लिंबू मिरची असे एकत्र असलेले एक वस्तू ठेवली होती. सदर अपक्ष उमेदवाराच्या संबंधित व्यक्तीने ती पहिल्याची तक्रार उमेदवाराने केली आहे. तसेच याप्रकरणी ज्या अधिका-याने एक कृती केले असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यांच्या लढतीकडे लक्ष असणार आहे.

अंगठा बहादराच्या जागी दुस-याचेच मतदान
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका मतदान केंद्रावर अंगठा बहाद्दर मतदाराने त्याच्या जागी दुस-या मतदाराने मतदान करून स्वाक्षरी केल्याचा आरोप केला आहे. आपल्याला लिहिता वाचता येत नाही मग स्वाक्षरी कुठून करणार. माझ्या जागी दुस-यानेच मतदान केले आहे. त्यामुळे मला अधिकारी मतदान करू देत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली.

करकंब येथे आमदाराच्या भावाकडून दादागिरी
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका मतदान केंद्रावर आमदार अभिजीत पाटील यांच्या भावाने दादागिरी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. भागात तीस वर्षे आमदार असलेल्यांनी कधी दादागिरी केली नाही मात्र केवळ दोन वर्षांमध्ये आमदारांचा भाऊ दादागिरी करत असल्याचा आरोप होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR