33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांना मराठा समाजाबद्दल एवढी जळजळ का?

भुजबळांना मराठा समाजाबद्दल एवढी जळजळ का?

मनोज जरांगे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. भुजबळ यांना मराठा समाजाबद्दल एवढी जळजळ, आकस का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना विचारला आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे राज्यात तणाव वाढत आहे, असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.

आमच्यासोबत चर्चेसाठी न्यायाधीशांना देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले की, एकनाथ शिंदे यांनी हे मला माहीत नाही. पण पाठवणा-यांनी आणि येणा-यांनी योग्यच केले. खुर्चीत बसून न्यायदान करणे आणि जनतेत जाऊन न्यायदान करणे चांगलेच आहे. न्यायाधीश जनता दरबार घेऊन शकतात. जनतेत येऊ शकतात. न्याय करणारे जनतेत गेले तर तुम्हाला काय वाईट वाटले. एवढीपण जळजळ का व्हावी मराठा समाजांबद्दल. भुजबळांना एवढी जळजळ का व्हावी?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलाय.

सामान्य ओबीसी लोकही म्हणतात ,भुजबळांनी सामान्य मराठ्यांचा एवढा राग करू नये. आम्ही भुजबळांच्या जातीचेच आहोत. त्यांनी एवढे करू नये. आम्ही सर्व एकाच ताटात खातो. भुजबळांनी एवढी जळजळ करू नये. भुजबळांमुळे तणाव वाढत आहे. भुजबळांना मराठ्यांबद्दल एवढा आकस का तेच कळत नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR