नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून सध्या चीनभारतापेक्षा खूप पुढे असला, तरी पुढील काही दशकांत हे चित्र बदलू शकते. क्रयशक्ती समता (पीपीपी)या निकषावर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत राहिल्यास जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नातील (जीडीपी) वाट्यात २०६० पर्यंत भारत चीनलाही मागे टाकू शकतो, असा अंदाज वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबशी संबंधित संशोधकांनी अहवालात व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय आर्थिक अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारताचा जीडीपी ४.१५ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, ब्रिटन आणि जपानच्या मागे राहू शकतो. सध्या जागतिक जीडीपीमध्ये पीपीपीच्या आधारावर चीनचा वाटा सुमारे २० टक्के आहे. हा वाटा अमेरिकेपेक्षा जवळपास एक-तृतीयांश अधिक आहे. २०३५ पर्यंत चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जवळपास दुप्पट होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, चीनसमोर लोकसंख्येतील घट हे मोठे आव्हान आहे.
भारताला कसा फायदा?
लोकसंख्येत घट झाल्यामुळे चीनचा जागतिक जीडीपीतील वाटा काही काळ स्थिर राहिल्यानंतर कमी होऊ शकतो. त्याच काळात भारताला फायदा होऊ शकतो.
















