नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने आपली क्षेपणास्राची ताकद नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ‘प्रोजेक्ट विष्णु’ अंतर्गत भारत आता शत्रूंची झोप उडवणार आहे. या प्रोजेक्टवर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना वेगाने काम करीत आहे. भारत आतापर्यंतच्या सर्वात अत्याधुनिक हायपरसॉनिक मिसाईल टेक्नॉलॉजीवर काम करीत आहे.
या स्पेशल प्रोजेक्ट अंतर्गत एकाच वेळी १२ वेगवेगळ्या हायपरसॉनिक मिसाईवर काम करीत आहे. या मिसाईल इतक्या वेगवान असतील की संपूर्ण आशियात शक्ती संतुलन बदलण्याची त्यांची क्षमता आहे. या मिसाईलचा वेग ८ मॅक म्हणजे सुमारे ११,००० किलोमीटर प्रति तास असणार आहे. या वेगामुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीन सारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.
‘प्रोजेक्ट विष्णु’द्वारे हल्ला करणारेच मिसाईल बनवल्या जातील असे नव्हे, तर याशिवाय इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीम देखील बनवली जात आहे. जी शत्रूच्या क्रुझ वा बॅलेस्टीक अशा दोन्ही मिसाईलना हवेतच नष्ट करू शकेल. म्हणजेच भारताची हवाई सुरक्षा देखील आधीपेक्षा अनेक पटीने मजबूत होणार आहे.
२०३० पर्यंत हायपरसॉनिक ग्लाईड व्हीईकल तंत्रज्ञानाला संपूर्णपणे ऑपरेशनल केले जाणार आहे. यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही भागास काही मिनिटात टार्गेट करता येणार आहे. खास बाब म्हणजे या मिसाईलना रोखणे शत्रूंना जवळपास अशक्य असणार आहे.
कंट्रोल होणार, रडारना चकवाही देणार
या मिसाईलमध्ये अत्याधुनिक अॅडव्हान्स नेव्हीगेशन आणि कंट्रोल सिस्टीम देखील असेल. म्हणजे मिसाईलना लाँच केल्यानंतर देखील मधल्या रस्त्यात याचे टार्गेट बदलता येणार आहे. याशिवाय शत्रूच्या रडारला देखील चकवा देण्यास सक्षम होणार आहे. या मिसाईलची रेंज सुमारे २००० किलोमीटरपर्यंत असणार आहे. ही मिसाईल पारंपारिक ते अणूबॉम्ब देखील वाहून नेण्यास सक्षम असणार आहे.

