25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत डम्परने चौघांना चिरडले, संतप्त जमावाचा ठिय्या

मुंबईत डम्परने चौघांना चिरडले, संतप्त जमावाचा ठिय्या

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील गोवंडी भागातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गोवंडीतील शिवाजीनगर लोटस जंक्शन भागात एका डम्पर चालकाने रस्त्यावर चालणा-या तीन लहान मुलांसह चौघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने अपघात घडलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, शनिवारी गोवंडीतील शिवाजीनगर या भागात एका डम्परचालकाने चार जणांना चिरडले. या घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील संतप्त झालेल्या जमावाने डम्परचालकाला घेरले आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जमावाने डम्परचालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनेची चौकशी करून डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साकीनाक्यावरून दुचाकीवर चार जण देवनारच्या दिशेने जात असतानाच घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील शिवाजीनगर येथील लोटस जंक्शनजवळ त्यांच्या दुचाकीला डम्परने धडक मारली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, इतर दोन जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला. देवनार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन डम्परचालकाला अटक केली.

या घटनेनंतर परिसरातील लोक एकत्र झाले आणि संतप्त जमावाने ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR