संसदेचे गुरुवारपासून विशेष अधिवेशन

३ दिवस अधिवेशन, पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयक मांडणार
विरोधी पक्षांचा वाढीव जागा, मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे विशेष अधिवेशन गुरुवार, दि. १६ ते १८ एप्रिलदरम्यान होत असून, पहिल्याच दिवशी अधिवेशनात
महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार असून, पहिल्याच दिवशी संसदेत नारीशक्ती वंदन सुधारणा अधिनियम, सीमांकन विधेयकासह ३ विधेयके मांडली जाणार आहेत. यात नारीशक्ती वंदन सुधारणा अधिनियम आणि सीमांकन विधेयकाबाबत सत्ताधारी विरोधकांत एकमत झालेले नाही. त्यामुळे यावरून सत्ताधारी-विरोधकांत चांगलीच जुंपणार आहे. कारण विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना, लोकसभेच्या वाढीव जागांना विरोध केला. त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठबळ दिले. परंतु लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित सीमांकन विधेयकाला विरोधकांनी विरोध केला असून, या विधेयकाच्या विरोधात मतदान करून आम्ही विरोध करू, असे कॉंग्रेस नेते म्हणाले. २०२९ पासून वाढीव जागांसह महिला आरक्षण लागू करण्यात येणार असल्याने आवश्यक ती कायद्यात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने हे विशेष अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे सत्ताधा-यांचे म्हणणे आहे. महिला आरक्षण कायदा लागू करण्यासाठी लोकसभेच्या जागांची संख्या ८५० पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. यातील २७३ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे.
सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. विरोधी पक्षांनी एवढ्या जागांमध्येच महिलांना आरक्षण द्यावे, असे म्हटले. परंतु एनडीएने जागा वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे ठरवले आहे.

सरकार १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात २०२९ पासून लोकसभेत ३३% महिला आरक्षण लागू करण्यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक आणत आहे. पंतप्रधान मोदी १७ एप्रिल रोजी चर्चेला उत्तर देऊ शकतात. हे बदल २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून लागू करण्याची योजना आहे. मात्र, यावर विरोधही सुरू आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सांगितले की, दक्षिणेकडील राज्यांना जागा वाढवणे मान्य नाही. त्यामुळे यावरून वाद उफाळण्याची शक्यता आहे.

सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. सरकार १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात २०२९ पासून लोकसभेत ३३% महिला आरक्षण लागू करण्यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक आणण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान मोदी १७ एप्रिल रोजी चर्चेला उत्तर देऊ शकतात. हे बदल २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून लागू करण्याची योजना आहे. मात्र, यावर विरोधही सुरू झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सांगितले की, दक्षिणेकडील राज्यांना जागा वाढवणे मान्य नाही. विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

पक्ष आरक्षणाच्या विरोधात
नाही; कॉंग्रेस अध्यक्ष खरगे
काँग्रेस महिला आरक्षणाच्या विरोधात नाही. सरकार राजकीय कारणांमुळे ते पुढे रेटत आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली चुकीचे सीमांकन (डिलिमिटेशन) आणले जात आहे. हे संघराज्यीय संरचनेच्या विरोधात आहे, असे केसी वेणुगोपाल म्हणाले. सीमांकनापूर्वी (डिलिमिटेशन) सर्व राज्ये आणि पक्षांशी चर्चा व्हायला हवी, असे शशी थरूर म्हणाले.

२०२९ ची सरकारची
तयारी : सिब्बल
सरकार हे सर्व २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याच्या उद्देशाने करत आहे. जर सरकारला महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यायचे असेल तर ते सध्याच्या ५४३ जागांमध्येच लागू केले जाऊ शकते. जागांच्या पुनर्वितरणामुळे उत्तर भारताला जास्त फायदा होईल.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news