Homeमुख्य बातम्याप्रगतीला गती देणारा कौल! महाराष्ट्रातील 'महाविजया'वर मोदींचे शिक्कामोर्तब

प्रगतीला गती देणारा कौल! महाराष्ट्रातील ‘महाविजया’वर मोदींचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महापालिकांच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे, हेच या निकालातून दिसून येते. हा कौल केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणारा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.

या यशात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांचे विशेष कौतुक केले. “महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याच वेळी विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले,” असे म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.

‘मोदी मॅजिक’ कायम?

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. मुंबईसह पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला ‘महाविजय’ म्हटले असतानाच, आता पंतप्रधान मोदींनीही या विजयावर आनंदाची मोहोर उमटवली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR