लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि २० मे रोजी खासदार डॉ. शिवाजी काळगे, महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये दडलेली क्रीडा प्रतिभा पुढे आणण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असून, या स्पर्धेची संकल्पना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. किरण जाधव, रेणा कारखाना चेअरमन अनंतराव देशमुख, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, पंचायत समिती उपसभापती महेश चव्हाण, सुहास कदम, दत्तात्रय शिंदे,जिल्हा युवक काँगेस अध्यक्ष निलेश देशमुख,जिल्हा बँक संचालक अनिताताई केंद्रे, स्वयंप्रभा पाटील,बाजार समिती संचालक प्रकाश सुर्यवंशी, प्रमोद कापसे, अॅड. समद पटेल, संतोष देशमुख, रविंद्र काळे, अनुप शेळके, प्रदीप राठोड, मारुती पांडे, सचिन पाटील, विश्वजीत पाटील, शेषराव हाके पाटील, राजकुमार पाटील, प्रविण सुर्यवंशी, सोनू डगवाले, गणेश ढगे, प्रविण माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमधून अनेक गुणवंत खेळाडूंना मोठ्या स्तरावर संधी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करून आयोजक माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे त्यांनी कौतुक केले. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद
मिळवली.
















