शिवरायांनी महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त केले

लातूर : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो. प्रतिकूल परिस्थितीत ही शत्रूचा बिमोड करून छत्रपती शिवरायांनी गुलामीत असणा-या महाराष्ट्राला मुक्त केले. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामुळे शिवराय उभ्या जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक युवराज शिंदे यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मळवटी ता. लातूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सय्यद जाकरअली, श्रीकृष्ण पवार, श्रीमती वैभवी पवार, विलास गिरी, चंद्रकांत चोपले, मधुकर गरड, बिटाची भोसले, सुनील आगलावे व विद्यार्थी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. त्यामुळे स्वातंर्त्य सैनिक लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली. त्या काळात लोकमान्य टिळक जनतेला सोबत घेऊन ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देत होते त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिक करीत त्या साजरी करण्याचे आव्हान जनतेला केल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा लढा गुलामगिरी विरोधात होता.
 बहुजनांचे राज्य आले पाहिजे. दिनदलीत, शेतकरी, मजूर यांना न्याय मिळाला पाहिजे. ही त्यांच्या स्वराज्याची संकल्पना होती. स्वराज्य साकार करण्यासाठी त्यांना शहाजीराजे, राजमाता जिजाऊंचे संस्कार प्रशिक्षण आणि प्रेरणा लाभली होती. संत साहित्यांचा वैज्ञानिक वाद व विवेक वाद हा स्वराज्याचा मूलमंत्र होता म्हणूनच सा-या लढाया शिवरायांनी अमावस्येच्या रात्री केल्या. म्हणून केवळ महाराष्ट्रात भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news