अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवनीत राणा म्हणाल्या की, स्प्रिंकलर का सुरू झाले नाही? सिलिंडरचा स्फोट कसा झाला? याची चौकशी होणार आहे. मी स्वत: अन् रवी राणाजी देखील मंत्रिमहोदयांशी बोलले आहेत. याची चौकशी १०० टक्के होणार आहे. निष्काळजीपणा करणा-यांची खैर नाही, त्यांच्यावर कडक पद्धतीने कारवाई होईल. तीन लहान मुलांचे जीव जेव्हा जाते मी सगळ्यांना सांगेल की यात चुकीतचे अडथळे तर त्यावर कडक कारवाई करावी.
रवी राणा यांनी रुग्णालया प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, डॉक्टर आणि व्यवस्थेचा बेफिकीरपणा आहे. सकाळी साडेतीन वाजल्यापासून डॉक्टर आणि इतर लोकांच्या संपर्कात मी आहे. तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागली होती. तेव्हा जुन्या बिल्डिंगमधून नव्या इमारतीत शिफ्ट करण्यात आले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. फायर ऑडिट झाले नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. फायरब्रिगेडची गाडीही उशीरा पोहोचली, त्यावरही मी स्वत: कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
ठाकरेंच्या शिलेदाराची टीका
आमदार अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर ट्विट करत म्हटले कीस ‘इन्फ्रामॅन’ वगैरे ऐकायला तुम्हाला ठीक वाटत असेल; पण अमरावतीत व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालके होरपळून दगावली आहेत, साहेब! यात तातडीने कडक कारवाई अपेक्षित आहे, तीही बड्या माशांवर. तुमच्या आरोग्यमंत्र्यांनाही तिकडे पाठवा; महाराष्ट्राला कळू द्या की राज्यात या खात्याला कोणी मंत्री आहेत!खात्याला कोणी मंत्री आहेत!
















