नवी दिल्ली : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आता आठवड्यावर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास आणि रोषणाईने उजळून निघणार आहे.