नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चेन्नईत नीट परीक्षेत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करीत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही. पण त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी, असे म्हटले. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे पालकांना शोक करताना पाहण्यापेक्षा अधिक वेदनादायी काहीच नाही.
नीट पेपरफुटी झाल्यापासून पंतप्रधानांनी ना पीडित पालकांची भेट घेतली, ना अशा कोणत्याही विद्यार्थ्यासोबत बसले आहेत, ज्याचे भविष्य या पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झाले. पंतप्रधानांनी शुक्रवारी रात्री 11 वाजता एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात ते म्हणाले, ह्लजंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान काही मुलांनी मला आणि माझ्या आईला शिवीगाळ केली, पण मला त्या मुलांना माफ करायचे आहे, कारण बालपण हे चुका सुधारण्याचा काळ असतो.
राहुल गांधी ट्विट करत काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या पालकांनी आपली मुले गमावली आहेत, त्यांचे अश्रू आणि आक्रोश यापेक्षा मोठे दु:ख दुसरे नाही. हे दु:ख त्यांच्यासोबत कायम राहील आणि या तुटलेल्या व भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्नही निर्माण करते. पेपरफुटी, रद्द झालेल्या परीक्षा, एका क्षणात वाया गेलेली वर्षानुवर्षांची तयारी, आपल्या विद्यार्थ्यांना अशा व्यवस्थेत प्रामाणिकपणे काम करण्यास सांगितले जाते, जी स्वत:च अप्रामाणिक आहे. आणि तरीही पंतप्रधानांमध्ये विद्यार्थ्यांना ह्लमाफह्व करण्याबद्दल बोलण्याचे धाडस आहे. ज्यांनी आपले मूल गमावले आहे, किंवा ज्यांची बचत, आयुष्य, वेळ आणि स्वप्ने पेपरफुटीमुळे हिरावली गेली आहेत, अशा एकाही शोकाकुल कुटुंबाला ते भेटले का? उत्तर आहे, नाही. भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी.
जे मतदारसंघ पुनर्रचनेचे समर्थन करणार ते देशद्रोही
चेन्नई दौ-यात राहुल गांधी यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ह्लमतदारसंघ पुनर्रचना हा तामिळनाडूच्या जनतेचे मतदानाचा हक्क काढून घेण्याचा कट आहे. यामुळे तामिळनाडू कमकुवत होईल असे ते म्हणाले. त्यांनी याला भाजपचा कट म्हटले. ह्लजो कोणी मतदारसंघ पुनर्रचनेचे समर्थन करतो, तो तामिळनाडूशी गद्दारी करत आहे. ही तामिळनाडूच्या भविष्याशी केलेली गद्दारी आहे असे ते म्हणाले.
















