Homeआरोग्यथंडी तापाकडे दुर्लक्ष केल्यास किडनीचे दुुखणे

थंडी तापाकडे दुर्लक्ष केल्यास किडनीचे दुुखणे

लसी वेळेवर घेणे गरजेचे आरोग्य तज्ज्ञांनी दिली माहिती

मुंबई : सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या आजाराने पीडित व्यक्ती ब-याचदा पूर्णपणे निरोगी वाटतात आणि म्हणूनच आपल्याला लसीकरणाची गरज नाही असे त्यांना वाटते. वैज्ञानिक पुराव्यांनुसार की किडनीच्या सौम्य आजारामुळेही रुग्णांना संसर्ग, विषाणूशी संबंधित कर्करोग आणि लसीला मिळणारा प्रतिसाद कमी होण्याचा धोका वाढतो.

पावसाळ्यात जेव्हा संसर्गाचे प्रमाण वाढते तेव्हा हे अधिक चिंताजनक ठरते. मुंबईच्या झेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विश्वनाथ बिल्ला, यांनी किडनीच्या विकाराने पिडित व्यक्तींसाठी लसीकरणाची भूमिका किती महत्त्वाची आहे ?रोगप्रतिकारक शक्ती आणि किडनीचे आजार तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत याविषयी काही टिप्स दिल्या आहेत. मूत्रपिंड (किडनी) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे.

मूत्रपिंड तुमच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की दीर्घकालीन किडनीचा बिघाड असलेल्या रुग्णांमध्ये होणा-या एकूण मृत्यूंपैकी ७०% मृत्यू हे हृदयरोग आणि संसर्गामुळे होतात. सीकेडी (क्रोनिक किडनी डिसीज) रुग्णांमध्ये टी सेल्स म्हणजेच जे रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे नियमन करते आणि अति प्रतिक्रिया टाळते. स्वत:च्या शरीराच्या पेशींवर हल्ला होऊ देत नाही आणि ऑटोइम्यून प्रतिक्रिया नियंत्रित ठेवते अशा पेशी आणि बी सेल्स म्हणजेच बी लिम्फोसाइट्स अ‍ॅन्टीबॉडीज तयार करतात, जे आपल्या शरीराला विशिष्ट प्रतिजनांशी लढण्यास मदत करतात अशा दोन्ही पेशींचे प्रमाण कमी होते. मूत्रपिंडाच्या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते.

पावसाळ्यात वाढतोय संसर्गाचा धोका
पावसाळ्याच्या काळात, वाढलेली आर्द्रता, दूषित पाण्याचे स्रोत आणि रोग वाहक अशा डासांच्या प्रसारामुळे संसर्ग पसरण्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होते. प्रमुख भारतीय शहरांमधील अभ्यासातून असे दिसून आले आहे की पावसाळ्यात तीव्र तापाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या १३.२१% रुग्णांना तीव्र मूत्रपिंड दुखापत झाली आहे.

काय काळजी घ्याल?
१. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. उघड्यावरील बर्फाचे सेवन टाळा.रस्त्यावरील अन्न पदार्थ किंवा पेयांचे सेवन टाळा.
२. योग्य स्वच्छता राखा. कमीत कमी २० सेकंद साबणाने हात धुवा. साबण उपलब्ध नसेल अशा ठिकाणी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरा. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी ओले कपडे ताबडतोब बदला.
३. डासांपासून संरक्षण करा. डास प्रतिबंधात्मक उत्पादनांचा वापर करा.सकाळी आणि संध्याकाळी लांब बाह्यांचे कपडे घाला. घराच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा.
४. ताजे,शिजवलेले, गरम अन्न खा. उघड्यावरील कापलेली फळे आणि कच्च्या भाज्यांचे सेवन टाळा. उच्च-सोडियम असलेल्या पावसाळी स्रॅक्सचे सेवन टाळा.
५.कधीही स्वमर्जीने औषधोपचार करू नका, कोणतीही नवीन औषधे घेण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR