तामिळनाडूत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध

चेन्नई : केंद्र सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय तमिळनाडूतील राजकीय पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तमिळनाडूच्या प्रतिनिधित्वावर मतदारसंघ पुनर्रचनेमुळे परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्यावर तमिळनाडू तसेच अन्य दक्षिणेकडील राज्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी राज्य विधानसभेत ठराव मंजूर करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

या बैठकीला मुख्यमंत्री विजय यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि विदुथलाई चिरुथैगल काचीचे प्रमुख थोल थिरुमावलवन उपस्थित होते. मात्र, राज्यातील मोठ्या संख्येने खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. तमिळनाडूतील राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण ५७ खासदारांपैकी तब्बल ३७ खासदार बैठकीला उपस्थित नव्हते. उपस्थित २० खासदारांमध्ये काँग्रेसचे १२ खासदार होते. याशिवाय व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआय(एम)चे प्रत्येकी २ खासदार, तर एमडीएमके आणि आययूएमएलचा प्रत्येकी १ खासदार बैठकीला उपस्थित होता.

बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा आणि राज्यसभेतील जागांचे २.२:१ हे प्रमाण कायम ठेवण्याची मागणी खासदारांनी केली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावर तमिळनाडू आणि इतर दक्षिण भारतीय राज्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य विधानसभेत ठराव मंजूर करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी सर्व खासदार आणि राजकीय पक्षांनी तमिळनाडूच्या अधिकारांच्या रक्षणासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रक्रियेमुळे तमिळनाडूचे राजकीय प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व कमी होण्याची शक्यता असल्याचे विजय यांनी म्हटले.

द्रमुक आणि अन्नाद्रमुकचा बैठकीवर बहिष्कार
तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रविड मुनेत्र कळघम आणि अण्णाद्रमुक यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. डीएमकेने बैठकीच्या कार्यवाहीला तमाशा संबोधले, तर एआयएडीएमकेने ही बैठक घाईघाईने आयोजित केलेले नाटक असल्याची टीका केली.

लोकसभेच्या ५४३ जागांमध्ये बदलाची गरज नाही
बैठकीनंतर कायदामंत्री आर. निर्मल कुमार यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेला विरोध करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. निवडून आलेल्या सभागृहांमधील खासदारांची संख्या किंवा रचनेत बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील ५४३ सदस्यांच्या संख्येत कोणताही बदल करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तमिळनाडूच्या ३९ लोकसभा जागांमध्येही कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही असे निर्मल कुमार यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार निवडणुकीतील राजकीय गणित आणि सहज विजय मिळवण्याच्या उद्देशाने मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पुढे नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तमिळनाडूला मतदारसंघ पुनर्रचनेची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news