33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयशालेय पुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारत केले जाणार समाविष्ट

शालेय पुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारत केले जाणार समाविष्ट

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) समाजशास्त्र विषयाच्या शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा समावेश करण्याची आणि शाळांमधील वर्गखोल्यांच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस केली आहे. समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी मंगळवारी (२१ नोव्हेंबर) ही माहिती दिली.

इयत्ता ७ ते १२ च्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवणे महत्त्वाचे आहे यावर इसाक यांनी भर दिला. ते म्हणाले की, समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये शिकवण्यावर भर दिला आहे. आमचा विश्वास आहे की, किशोरावस्थेत विद्यार्थ्यामध्ये स्वाभिमान, देशभक्ती आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढतो. देशभक्तीच्या अभावामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेतात. त्यामुळे त्यांची मुळे समजून घेऊन त्यांच्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे गरजेचे आहे.

ते म्हणाले की, सध्या काही शिक्षण मंडळे विद्यार्थ्यांना रामायण शिकवतात, मात्र ते मिथक म्हणून शिकवतात. जर ही महाकाव्ये विद्यार्थ्यांना शिकवली गेली नाहीत तर शिक्षण पद्धतीचा कोणताही उद्देश नाही आणि ती राष्ट्रसेवा ठरणार नाही. तत्पूर्वी, इसाक म्हणाले होते की, पॅनेलने इयत्ता ३ ते १२ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्राचीन इतिहासाऐवजी ‘शास्त्रीय इतिहास’ समाविष्ट करण्याची आणि ‘इंडिया’ नाव बदलून ‘भारत’ करण्याची शिफारस केली होती.

एनएसटीसी अंतिम विचार करणार
वृत्तानुसार, गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमासाठी अनेक शिफारसी केल्या आहेत. या शिफारशी एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांसाठी महत्त्वाचे निर्देशात्मक दस्तऐवज आहेत. १९ सदस्यीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन सामग्री समिती (एनएसटीसी) द्वारे जुलैमध्ये वर्गांसाठी अभ्यासक्रम, पुस्तके आणि शिक्षण सामग्री अंतिम करण्यासाठी समितीच्या शिफारशींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

पुढील सत्रात नवीन पुस्तके येऊ शकतात
अलीकडेच एनएसटीसीने सामाजिक शास्त्रांसाठी अभ्यासक्रम आणि शिक्षक शिक्षण सामग्री विकसित करण्यासाठी एक अभ्यासक्रम क्षेत्र गट (कॅग) देखील तयार केला आहे. एनसीईआरटी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे. एनसीईआरटीची नवीन पुस्तके पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR