टेंभुर्णी : प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाने जलद गतीने का होईना आज अखेर उजनी धरण १०० टक्के भरले असून दौंड येथून ६६.४९२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे. त्यामुळे उजनीचा शंभरीचा पल्ला गाठला आहे .
उजनी भरल्याने शेतकऱ्यांच्या बरोबर उद्योग धंदे, कारखानदार उजनीवर पिण्याचे पाणी अवलंबून असणाऱ्या सोलापूर सह छोट्या मोठ्या शहरांतील नागरिकांचा, गावकर्यांचा जीव भांड्यांत पडला आहे.उजनी धरणांच्या वाढत्या पाणीसाठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले होते.
















