कळंब : सतीश टोणगे
शेजारच्या घरात काय चालले आहे, याची एक उत्सुकता असते, ती सवय सगळ्यांना च असते. धाराशिव लोकसभेचे मतदान झाले आता , बीड लोकसभा ची रणधुमाळी चालू आहे, धाराशिव जिल्ह्यातील बहतांश कार्यकर्ते यांनी आता आपला मोर्चा बीड कडे ओळवला आहे, तर जे गेले नाहीत ते मात्र …काय होतय बीड मध्ये, कुणाचा नंबर लागेल, शेतकरी पुत्र की संघर्ष कन्या या पैकी कुणाची हवा आहे. अशी विचारणा करू लागले आहेत.
कळंब पासून एक किलो मीटर नंतर बीड जिल्हा सुरू होतो,कळंब चे जावाई बजरंग सोनवणे व पंकजा ताई मुंडे यांच्या लढत होत आहे. केज , धारूर येथील शेतकरी, व्यापारी , कामगार यांचा रोज कळंब शी संपर्क आहे.त्या मुळे या निवडणुकी कडे लक्ष लागले आहे……शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे व संघर्ष कन्या पंकजा ताई मुंडे या दोघांचे हि समर्थक धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.
त्यामुळे धाराशिव नंतर बीड जिल्ह्यात कोण येणार , याची चर्चा होत असतानाच , शर्यती लावल्या जात आहेत….मराठा आरक्षणावर येथील मराठा समाज आक्रमक होता, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन हि झाले आहे, त्या मुळे याचा फटका कुणाला बसनार, याचे आखाडे बांधले जात आहेत……हा मतदार संघ भा.ज.प. व शरद पवार गटाने प्रतिष्ठेचा केला आहे या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादि चे नेते शरद पवार यांच्या सभा झाले आहेत…..काय चाललय शेजारच्या मतदार संघात…याची कुजबूज वाढू लागली आहे.