लातूर : प्रतिनिधी
शहरात कचरा जाळण्याच्या घटना थांबता थांबत नाहीत. दररोज कुठेना कुठे कचरा जळत असल्याच्या घटना घडत आहेत. दि. २३ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी पीव्हीआर चौका ते औसा रिंग रोडवरील ज्ञानदेव मंगल कार्यालयाच्या समोर कचरा पेटवून देण्यात आला. कचरा मोठ्या प्रमाणात जळाल्याने आग मोठी लागली होती. कचरा जाळणा-यांवर लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाकडन्ूा कारवाई केली जात असली तरी कचरा जाळण्याच्या घटना मात्र कमी होत नाहीत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाची तीव्रता सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत कचरा जाळणे योग्य नाही. कारण आग पसरुन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.