लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेच्या विविध जिल्हा शाखांतर्गत बालरंगभूमी क्रिकेट लीग (बीसीएल) दि.. ६, ७ जून रोजी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातील निवडक १६ जिल्हा शाखाचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत लातूरचा संघ उपविजेता
ठरला.
स्पर्धेत लातूर शाखेच्या लातूरकर लायन्स संघाने अहिल्यानगर, सांगली व पुणे संघांना पराभूत करुन बीसीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत लातूरकर लायन्स विरुद्ध रत्नागिरी मँगो किंग्स अशी लढत झाली. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या या सामन्यात रत्नागिरी मँगो किंग्स विजेता ठरला तर लातूरकर लायन्स उपविजेते ठरले. उपविजेत्या संघास ३१ हजार रुपये व करंडक देऊन बालरंगभूमी परिषद, महाराष्ट्रच्या अध्यक्षा निलम शिर्के, उपाध्यक्ष व अॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज लातूरचाच पंकज सुरवसे ठरला. स्पर्धेतील यशस्वी संघात राहुल गायकवाड, रणजित आचार्य, मयुर राजापूरे, शुभम सालमे, शैलेश तिवारी, नितीन पुट्टेवाड, पंकज सुरवसे, मुन्ना कोरे, आकाश माने, आकाश बाभळे, कृष्णा खानापुरे, विशाल वाटवडे, राम रेड्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या संघाचे विविध स्तरावर कौतुक होत आहे.
















