केळीचे १००० कंटेनर इराणमध्ये अडकले

मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतक-यांना बसताना दिसत आहे. जेएनपीए बंदरातून इराणकडे पाठवलेले जवळपास ८०० ते १ हजार केळीचे कंटेनर तिथेच अडकून पडले असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी युद्धाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणा-या शिपिंग कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकरी आणि निर्यातदार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ देशांकडे जाणारे १२०० ते १५०० कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले होते. सुमारे १५ दिवसांनी यातील काही कंटेनर इराणकडे पाठवण्यात आले, तर काही स्थानिक बाजारात विक्रीसाठी वळवण्यात आले. इराणमध्ये कंटेनर पोहोचल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी युद्धाचा आधार घेत भाड्यात मोठी वाढ केली. आधी २ ते ३ लाख रुपये असलेले भाडे थेट १५ लाख रुपयांपर्यंत नेण्यात आलं. या वाढलेल्या खर्चामुळे निर्यातदार आणि शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

इराणमध्ये माल अडकला
इराणमध्ये पोहोचलेले जवळपास १ हजार कंटेनर शिपिंग कंपन्यांनी अडवून ठेवल्याने केळी खराब होऊ लागली आहेत. एकीकडे वाढलेले भाडे आणि दुसरीकडे खराब होणारा माल, यामुळे शेतक-यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

शेतक-यांचा आक्रोश
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोलापूरमधील ५० ते ६० शेतक-यांनी शिपिंग कंपन्यांमध्ये धडक देत जाब विचारला. मात्र काही कंपन्यांनी पोलिसांना बोलावून शेतक-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

हिंगोलीतील शेतकरी संकटात
युद्धाचा परिणाम हिंगोली जिल्ह्यातील केळी निर्यातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. निर्यात बंद झाल्यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीला फक्त ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.

इतर पिकांनाही फटका
धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतक-यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. निर्यात बंद झाल्यामुळे कलिंगडाला अवघा सव्वा रुपये किलो दर मिळत असल्याचं चित्र आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news