33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयसेला टनलच्या बांधकामामुळे चीनचा संताप

सेला टनलच्या बांधकामामुळे चीनचा संताप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल दौ-यानंतर चीनचा तीळपापड झाल्याची माहिती आहे. त्यांना इतका राग आला की त्यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत भारताकडे राजकीय निषेध नोंदवला. अरुणाचल प्रदेशवर चीन आपला हक्क सांगत आहे. चीनने म्हटले आहे की, भारताच्या या गोष्टीमुळे सीमावाद आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये १३ हजार फूट उंचीवर बांधलेल्या सेला बोगद्याचे उद्घाटन केले. अरुणाचल प्रदेशातील रणनीति दृष्ट्या महत्त्वाच्या तवांगमध्ये हवामान कनेक्टिव्हिटी असलेला हा बोगदा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैनिक फार कमी वेळात चीनच्या सीमेवर पोहोचू शकतील. सेला बोगदा आसाम ते अरुणाचल प्रदेशातील तेजपूर ते पश्चिम कामेंग या रस्त्यावर बांधण्यात आला आहे. ते बांधण्यासाठी ८२५ कोटी रुपये खर्च आला आहे. इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब दोन लेन बोगदा आहे. सेला बोगद्याद्वारे चीनजवळील सीमावर्ती भागात सैनिक आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक सुलभ होणार आहे.

चीनचा तीळपापड?
अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन करतो आणि जेव्हा जेव्हा भारतीय नेते अरुणाचल प्रदेशला भेट देतात, तेव्हा ते आपला दावा सांगण्यासाठी निषेध नोंदवतात. चीनने या भागाला झांगनान असे नाव दिले आहे. अरुणाचल प्रदेशावरील चीनच्या पोकळ दाव्याचे भारताने सातत्याने खंडन केले आहे आणि तो आपला अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे. भारतानेही चीनच्या या निर्णयाला विरोध केला होता, ज्यात त्याने भारतीय क्षेत्रांची नावे ठेवली होती. चीनचे हे पाऊल वास्तव बदलणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR