जयपूर/नवी दिल्ली/ लखनौ : देशातील ६ राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बुधवारी वादळामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर खांब कोसळला. दोन गाड्यांचा मागील भाग दबला.
राजस्थानमधील सीकर आणि चुरूच्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे दुचाकी आणि गाड्या अडकल्या. दिल्लीत जोरदार वादळासह पाऊस झाला, तर हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे काचरंग नाल्याला पूर आला. मुंबईत अंधेरी सब-वेमध्ये पाणी साचल्याने तो तात्पुरता बंद करण्यात आला होता. विक्रोळी वेस्टमध्ये निवासी इमारतीजवळची भिंत कोसळली. अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, ज्यामुळे वाहनांचे नुकसान झाले.
अरुणाचल प्रदेशात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी कीयी पन्योर जिल्ह्यातील नीपको प्रोजेक्ट कॉलनीत पूर आला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, ४ लोक बेपत्ता आहेत आणि १८ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मान्सूनने ९ दिवसांच्या विलंबाने प्रवेश केला. यासोबतच मान्सून आता देशातील २२ राज्यांमध्ये पोहोचला आहे. ५ जुलैपर्यंत उर्वरित राज्यांनाही तो व्यापू शकतो.
















