अवैध स्थलांतरित बांगलादेशात परततायेत

कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणा-या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत आहे. हे लोक स्वत:ची ओळख सांगून बांगलादेशात परत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

तथापि, सीमा सुरक्षा दल त्यांना थेट सीमापार पाठवण्याऐवजी बायोमेट्रिक आणि इतर ओळखपत्रे घेऊन बंगालमध्ये तयार केलेल्या होल्डिंग सेंटरमध्ये पाठवत आहे. हकीमपूर सीमेवरील पडताळणी केंद्रावर दररोज सुमारे २०० ते ३०० लोक पडताळणीसाठी पोहोचत आहेत. यापैकी अनेक लोक वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात आले होते आणि आता बदलत्या परिस्थितीमुळे त्यांच्या भविष्याबद्दल चिंतित आहेत. अनेक लोकांकडे भारतीय कागदपत्रे आहेत, परंतु बांगलादेशी ओळखपत्रे नाहीत.

बीएसएफच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की अवैध स्थलांतरितांना शोधण्याची गरज नाही. लोक स्वत: पडताळणी करण्यासाठी आणि आपली ओळख नोंदवण्यासाठी चेकपोस्टवर पोहोचत आहेत. अधिका-यांच्या मते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि पडताळणीला बराच वेळ लागत आहे. स्थानिक संघटना भुका मानुषेर अधिकार अभियान चे अध्यक्ष मोहर मंडल यांच्या मते, पडताळणीसाठी पोहोचलेले बहुतेक लोक बांगलादेशातील सहा जिल्ह्यांतील आहेत आणि ते बेकायदेशीरपणे भारतात आले होते.

भारतात राहू शकत नाही, बांगलादेशात जाऊ शकत नाही
मुंबईत राहणा-या मोहम्मद अख्तर शेख यांनी सांगितले की ते २२ वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आले होते. त्यांच्याकडे भारतीय आधार कार्ड आहे, पण बांगलादेशाचे कोणतेही कागदपत्र नाही. त्यांना भीती आहे की आता ते ना मुलांसोबत राहू शकतील ना बांगलादेशात जाऊ शकतील. त्याचप्रमाणे, २० वर्षांपूर्वी मुर्शिदाबादच्या जलंगी सीमेवरून भारतात आलेले इस्लाम सरदार बोलता बोलता रडू लागले. ते म्हणतात मी बांगलादेशातील बारीसाल जिल्ह्यातून आलो होतो. दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये संपूर्ण आयुष्य घालवले. सर्वात मोठी भीती हीच आहे की दोन्ही देशांपैकी कोणीही आम्हाला स्वीकारले नाही तर काय होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32

Latest news