भारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली

न्यू यॉर्क : ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक तब्बल २१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही गुंतवणूक २४१.४ अब्ज डॉलरने कमी होऊन १९०.७ अब्ज डॉलर एवढीच राहिली आहे. गेल्या चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. त्यापूर्वी मात्र ही गुंतवणूक वाढतच चालली होती, मात्र आता टॅरिफनंतर ही गुंतवणूक झपाट्यानं कमी होत आहे.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते भारताने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, भारत ज्या पद्धतीने ही गुंतवणूक कमी करत आहे आणि इतर गुंतवणुकीचे मार्ग शोधण्यात येत आहेत, यावरून हे दिसून येत आहे की, भारताचे डॉलरवर असलेले अवलंबित्व कमी होत आहे. याची थेट झळ ही अमेरिकेला बसत असून गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या किंमतीमध्ये घट पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भारताने अमेरिकेला आणखी एक धक्का दिला आहे, तो म्हणजे काही देशांसोबत भारताने आता रुपयांमध्ये व्यवहार सुरू केला आहे.

अमेरिकेची चिंता वाढली
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्याचा सध्या दोन्ही देशांना देखील फटका बसत असल्याचे दिसून येत आहे, दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा दबाव असतानाच आता भारताने मोठी खेळी खेळल्याचे समोर आले आहे.

भारत अर्थव्यवस्था मजबूत करणार
टॅरिफ दबावात आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षभरात भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक झपाट्याने कमी केली आहे. हा अमेरिकेसाठी आणि अमेरिकन चलन असलेल्या डॉलरसाठी मोठा झटका मानला जात आहे, अमेरिकन ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आता भारताने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news