“विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवू देणार नाही”; शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात हजारो शेतकऱ्यांचा एल्गार, अमित देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

पंढरपूर : राज्यात प्रस्तावित असलेल्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला रविवारी पंढरपुरात मोठे स्वरूप प्राप्त झाले. शक्तीपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्बुद्धी दिंडी पायी यात्रा’ आणि भव्य जनआंदोलनात राज्यातील १३ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनात माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भर पावसात उपस्थित राहत शेतकऱ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवू देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असा इशारा दिला.

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर येत असतानाच शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाखरी पालखी तळ येथून सद्बुद्धी दिंडी यात्रेला प्रारंभ झाला. भर पावसातही हजारो शेतकरी हातात फलक, घोषणाबाजी आणि आंदोलनाची निशाणी घेऊन रस्त्यावर उतरले. वाखरी येथून सुरू झालेली ही दिंडी सह्याद्रीनगर, जुना कराड नाका, प्रबोधनकार ठाकरे चौक, स्टेशन रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचली. मंदिरात विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत आंदोलकांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची आणि हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना केली.

“शक्तीपीठ नव्हे, सक्तीपीठ महामार्ग”
यानंतर इसबावी येथील संतराज पॅलेस हॉलमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार अमित देशमुख यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “कोणत्याही नागरिकाने किंवा शेतकऱ्यांनी मागणी न केलेला हा महामार्ग सरकार जबरदस्तीने लादत आहे. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, सुपीक शेती उद्ध्वस्त करणारा आणि राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा हा प्रकल्प आहे. हा शक्तीपीठ महामार्ग नसून ‘सक्तीपीठ महामार्ग’ ठरत आहे. त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा.” शेतकऱ्यांनी उभारलेल्या या आंदोलनात आपण शेवटपर्यंत खंबीरपणे सहभागी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज (बंटी) पाटील, महादेव जानकर यांनीही सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांनी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेणारे प्रकल्प राबविण्याऐवजी पर्यायी मार्गांचा विचार करण्याची मागणी केली. यावेळी आमदार अभिजित पाटील, कैलास पाटील, उमेशराजे निंबाळकर, विजय देशमुख, अॅड. समद पटेल, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी तसेच राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी उपस्थित होते.

१३ जिल्ह्यांतील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणामाची भीती
आंदोलकांच्या मते, प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक शेती, शेतकऱ्यांची घरे, विहिरी, फळबागा आणि शेतीपूरक पायाभूत सुविधा बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
शेतकरी नेत्यांनी सरकारने महामार्गाचा प्रस्ताव मागे घेतला नाही, तर राज्यभरात अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. “विकासाला आमचा विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांचे अस्तित्व, शेती आणि ग्रामीण संस्कृती उद्ध्वस्त करणारा कोणताही प्रकल्प आम्ही स्वीकारणार नाही,” असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकरी संघटनांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, आगामी काळात या प्रकल्पावरून सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news